हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून धाराशिव पोलीसांनी फिर्यादींना केले परत, CYBER.”
मुख्य संपादिका महानंदा कसले

“हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून धाराशिव पोलीसांनी फिर्यादींना केले परत, CYBER.”
केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी CEIR[Central Equipment Identity Register] हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सदरचे पोर्टल धाराशिव जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस कार्यान्वित करण्यात आले असून फिर्यादी स्वतः आपली मोबाईल हरवल्याची तक्रार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवू शकतात. धाराशिव जिल्हयातील हद्दीमध्ये सन २०२४ २०२५ मध्ये चोरीस गेलेल्या / हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीसांनी CEIR [Central Equipment Identity Register] या पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी एकूण ३३ मोबाईल (किंमत ५०३,४३१/- रू.) शोधून काढण्यात धाराशिव पोलीसांना यश आले आहे. सुदर मोबाईल आज रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र सो, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, संभाजीनगर यांच्या हस्ते मा. पोलीस अधिक्षक सो., पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत फिर्यादींना परत करण्यात आले. त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, शफकत आमना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे पोनि शेख, पोशि ६४० / सुर्यवंशी, पोशि १८९४ / अंगुले, कळंब पोस्टेचे पोशि ९७६ / नारळकर, नळदुर्ग पोस्टेचे पोशि ३४५/ दांडेकर व शहर पोस्टेचे पोशि १८७१ / क्षिरसागर यांनी केली आहे. सर्व नागरिकांना धाराशिव पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर जवळच्या पोलीस ठाणेस तक्रार नोंद करावी. त्यानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने सुरू केलेल्या https://www.ceir. gov.in या वेबसाईटवर पोलीस ठाणेची फिर्याद व स्वतःचे आधार कार्ड अपलोड करून ऑनलाईन तक्रार नोंद करावी किंवा सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे संपर्क करावा.
जनसंपर्क